
आमच्याविषयी
About Us

स्वामी समर्थांविषयी
About Swami Samarth

"हम गया नही, जिंदा है."
माघ वद्य १, शके १३८० (इ.स. १४५८) रोजी श्री नृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाले. तेथे तीनशे वर्षे समाधीस्थ राहिल्यानंतर एका लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसल्याने ते प्रकट झाले. त्यानंतर काशी, कलकत्ता, गोदावरी तट, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ आणि सोलापूर मार्गे ते सन १८५७ मध्ये अक्कलकोट येथे आले.
श्री स्वामी समर्थांच्या जन्म, माता-पिता किंवा प्रारंभिक जीवनाविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही. तेजस्वी, आजानुबाहू आणि दिव्य व्यक्तिमत्त्व लाभलेले श्री स्वामी समर्थ हे श्री नृसिंह सरस्वतींचेच दत्तावतार मानले जातात. ते भक्तांना नेहमी अभय देत म्हणत, "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे."
अक्कलकोट येथे देहत्याग केल्यानंतरही त्यांचे वचन "हम गया नही, जिंदा है." आजही भक्तांना श्रद्धा, धैर्य आणि आधार देते.
श्री स्वामी चरित्रातील विविध प्रसंग हे चमत्कार नसून भक्तांना योग्य मार्ग दाखवणाऱ्या शिकवणी आहेत. राजा मालोजींचा गर्व दूर करणे, राम जोशींचे अज्ञान दूर करणे, रिकाम्या चिलमीतून धूर काढून टवाळखोरांना बोध देणे, कुष्ठरोग्यांना आरोग्य देणे आणि मेलेल्या उंदराला जीवदान देणे अशा अनेक लीलांमधून त्यांनी श्रद्धा, नम्रता आणि भक्तीचा संदेश दिला.
स्वामी समर्थांचा मूलमंत्र होता, "एकनिष्ठता, दृढता, प्रेम, श्रद्धा, एकोपा असल्यास भक्तिमार्ग सुकर होतो." तसेच ते नेहमी म्हणत, "सतराशेसाठ देव करण्यापेक्षा एकावर श्रद्धा ठेवा." एकाच ईश्वरावर दृढ विश्वास ठेवून भक्ती केल्यास जीवनाला योग्य दिशा आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो.
श्री स्वामी समर्थ मठ , भुईगांव : एक तीर्थक्षेत्र
Swami Samarth Math

श्री स्वामी समर्थांचा अवतार हा जगाच्या कल्याणासाठी असून त्यांनी भक्तिमार्गाची ज्योत प्रज्वलित करून विविध मठांच्या माध्यमातून लोकांना सत्याचा मार्ग दाखविला. त्यापैकी नालासोपारा स्टेशनपासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असलेला श्री स्वामी समर्थ मठ, भुईगांव हा एक प्रमुख भक्तिस्थळ आहे.
सुमारे चार हजार स्क्वेअर फुटांमध्ये वसलेला हा मठ शांत, प्रसन्न आणि आध्यात्मिक वातावरणाने नटलेला आहे. मठाच्या कळसावर भगवा ध्वज दिमाखात फडकताना दिसतो. प्रवेशद्वाराजवळ सभा मंडप, कडूलिंब व औदुंबर वृक्ष, शिर्डीचे साईबाबा, विठ्ठल-रखुमाई, श्री शंकर महाराज यांच्या प्रतिमा तसेच तुळशी वृंदावन, 'श्री गणेश' आणि 'श्री हनुमान' यांचे दर्शन भक्तांना घडते.
मुख्य गाभाऱ्यातील श्री स्वामी समर्थांची अतिशुभ्र संगमरवरी, तेजस्वी आणि प्रसन्न बैठी मूर्ती भक्तांना मंत्रमुग्ध करते. प्रथम कासवाला नमस्कार करून दर्शन घेतले जाते, तर मागील श्री गुरुदत्तांची प्रतिमा भक्तांचे विशेष लक्ष वेधून घेते.
आज श्री स्वामी समर्थ मठ, भुईगांव हे भक्तिमार्गाचे एक शक्तिकेंद्र आणि उदयोन्मुख शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. या भव्य वास्तूचे आणि स्वामींच्या दिव्य मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर भक्तांच्या मुखातून 'श्री गजानन विजय' ग्रंथातील ओवी आपोआप उमटते.
'मंदिर ऐसे व्हावे । अवघ्यांनीच वाखाणावे ।
पाहुनी त्या डोलावे । प्रत्येकाने आपुल्या मनी ।।
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ।


कुलभूषण संदीप म्हात्रे
About DADA



कुलभूषण संदीप यशवंत म्हात्रे
कै. यशवंत म्हात्रे आणि जनीबाई यांच्या पोटी जन्मलेले श्री. संदीप यशवंत म्हात्रे यांना वडिलांकडून दत्तभक्ती व नामस्मरणाचा वारसा लाभला. 'दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या अखंड नामजपाच्या संस्कारातूनच भुईगावचा श्री स्वामी समर्थ मठ उभा राहिला.
शिक्षणानंतर त्यांना लार्सन अँड टुब्रो (L&T) मध्ये नोकरी मिळाली. वडिलांच्या निधनानंतर संसाराची जबाबदारी सांभाळत त्यांनी सौ. सुलभा म्हात्रे यांच्याशी विवाह केला. स्वामींच्या कृपेची जाणीव ठेवून त्यांनी जवळपास दहा वर्षे गिरगावच्या कांदेवाडी मठातील सकाळच्या आरतीला नियमित उपस्थिती लावली आणि नोकरीच्या २४ वर्षांत २४ नामजपाच्या डायऱ्या पूर्ण केल्या.
घरातील सामुदायिक नामस्मरण, अक्कलकोट यात्रांचे आयोजन आणि परिसरात ईश्वरभक्तीचा प्रसार यामुळे अनेक भक्त स्वामीसेवेशी जोडले गेले. इच्छाशक्ती, जिद्द, शिस्त, नियोजन, संघटनकौशल्य आणि सेवाभाव यांच्या बळावर त्यांनी मठाच्या कार्याला नवी दिशा दिली. भक्तांच्या आनंदातच आपला आनंद मानणारे संदीपदादा नेहमी म्हणतात, 'कौतुक माझे नाही तर माऊलीचे कराल.' तसेच 'न सोडी कदा, स्वामी ज्या घेई हाती' या स्वामीवचनावर त्यांचा दृढ विश्वास आहे.
स्वामीसेवेसाठी अधिक वेळ देता यावा म्हणून त्यांनी ११ जानेवारी २०१३ रोजी L&T मधील उच्च पदाची स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून स्वतःला पूर्णवेळ स्वामीसेवेत समर्पित केले. आज दर गुरुवार व रविवार हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. सौ. सुलभा संदीप म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व सेवेकरी भक्तिभावाने सेवा बजावतात.
श्री. संदीप यशवंत म्हात्रे आणि सौ. सुलभा संदीप म्हात्रे या दाम्पत्याच्या समर्पणामुळे व सेवेकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे भुईगावचा श्री स्वामी समर्थ मठ आज एक प्रसिद्ध तीर्थस्थान म्हणून ओळखला जात आहे.

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

नि:शंक होई रे मना | निर्भय होई रे मना |
प्रचंड स्वामी बळ पाठीशी || नित्य आहे रे मना !
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी |
अशक्य ही शक्य करतील स्वामी ||१||
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय |
स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय |
आज्ञे वीण काळ ही ना नेई त्याला |
परलोकी ही ना भीती तयाला ||
अशक्य ही शक्य करतील स्वामी ||२||
उगाची भीतोसी भय हे पळू दे |
वसे अंतरी ही स्वामी शक्ति कळू दे |
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा |
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ||
अशक्य ही शक्य करतील स्वामी ||३||
खरा होई जागा | श्रद्धेसहित |
कसा होशी त्याविण | तू स्वामीभक्त |
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ |
नको डगमगू | स्वामी देतील हात ||
अशक्य ही शक्य करतील स्वामी ||४||
विभूती, नमन, नाम ध्यानाधी, तीर्थ |
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात |
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती |
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ||
अशक्य ही शक्य करतील स्वामी ||५||
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !!
जयदेव जयदेव..!!
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !!
जयदेव जयदेव..!!
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार, तेथे जडमूढ कैसा करु विस्तार !!
जयदेव जयदेव..!!
देवाधिदेव तू स्वामीराया, निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया, शरणागता तारी तू स्वामीराया !!
जयदेव जयदेव..!!
अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले, किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !!
जयदेव जयदेव..!!


पूजा सेवा
Puja Services
Daily and Special Pujas for devotees.

अन्नदान
Annadan
Free meals offered to devotees and the needy
आमचे उपक्रम
Our Activities


उत्सव
Celebration of Swami Jayanti, Punyatithi and major festivals.
Festivals

सत्संग
Spiritual Gatherings
Bhajan, Kirtan and discourses through the year.
